आंध्र प्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यात १८९५ मध्ये जिद्दु उर्फ जे. कृष्णमूर्ती यांचा जन्म झाला. थोऑसॉफीचे शिक्षण घेतलेल्या कृष्णमूर्ती यांनी संघटनेचा अडथळा दूर करीत आपली शिकवण लोकांपर्यंत पोचवली. सर्जनशील शिक्षणाचा पाया त्यांनी घातला.
रूढ धार्मिक पद्धतीशिवाय त्यांनी दिलेले विचार म्हणजे वर्तमानातील प्रश्नांकडे पाहण्याची नवी दृष्टी होय. त्यांचे विचार हेमकिरण पत्की यांनी 'मला उमजलेले जे. कृष्णमूर्ती'मधून मांडले आहेत.
खऱ्या शिक्षणाचे महत्व, मनाचे शिक्षण, शिस्त म्हणजे काय, निसर्गातून मिळणारा पाठ, वाचन, स्वतःला ऐकण्याची सवय, बुद्धी आणि भावना, सदभाव, निखळ पाहणे, तरुण मन, भय, एकटेपण, असमाधान, वस्तुस्थिती, अनुसरण, निनावी जगणे, साधेपणा, निसर्ग, रंग, हिंसा आदी वेगवेगळ्या ६२ विषयांवरील जे. कृष्णमूर्ती यांचे नवीन विचार यात वाचायला मिळतात. तसेच कृष्णमूर्ती यांची ओळख, त्यांचे कार्यही यात सांगितले आहे.